मराठीसाठी वेळ काढा

मराठीसाठी वेळ काढा

मराठीत टंकनासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड शिका -- तो शाळेतल्या पहिलीच्या पहिल्या धड्याइतकाच (म्हणजे अआइई, कखगघचछजझ....या पद्धतीचा ) सोपा आहे. मग तुमच्या घरी कामाला येणारे, शाळेत आठवीच्या पुढे न जाउ शकलेले सर्व, इंग्लिशशिवायच तुमच्याकडून पाच मिनिटांत संगणक-टंकन शिकतील. त्यांचे आशिर्वाद मिळवा.

मंगलवार, 15 नवंबर 2016

वादळाचा पाठलाग- दै लोकमत 13/12/99

13/12/99
वादळाचा पाठलाग

बातमी:-
ओरिसा राज्यात भयानक चक्रीवादळ. पारादीप बंदर संपूर्णपणे नष्ट. सुमारे बारा जिव्हे वादळग्रस्त. मालमत्तेचे प्रचंड नुकसान. मोठ्या प्रमाणावर जीवितहानी देखील. बहुधा या शतकातले हे सर्वात मोठे वादळ.

प्रतिक्रिया (महाराष्ट्र):-
पुनः एकदा लातूर भूकंपांची आठवण व्हावी अस भयानक वादळ आल आहे ओरिसात. हो, पण दोन प्रकारांनी ही घटना वेगळी आहे. लातूर भूकंपाचे भौगोलिक क्षेत्र अगदी मर्यादित होते- वीस पंचवीस गांव एवढेच. इथे सुमारे बारा जिल्हे क्षतिग्रस्त झालेत. ही वाव परिस्थिती हाताळण्याच्या दृष्टिने जास्त गैरसोयीची आहे. जागोजागी मोठमोठी झाड उन्मळून पडल्याने रस्ता अडले आहेत. त्यामुळे मदत पोचवण्यांत मोठी अडचण आहे. त्यातल्या त्या एक वर आहे- प्रत्येक गांवात जीवितहानी हा प्रकार झालेला नाही. कांही ठराविक गांवातच तसे झाले आहे.

या चक्रीवादळाने झालेले नुकसान
वेगवेगळ्या प्रकाराने झाले. कांही ठिकाणी दुर्दम्य वेगाचे वारे आले. सुमारे ताशी अडीचशे ते तीनशे किलोमीटर हा वेग! डेक्कन क्वीन पिंपरी ते तळेगांव या पह्यांत सर्वाधिक म्हणजे ताशी शंभर कि.मी. हा वेग सुमारे पंधरा मिनिटांसाठी गाठते. त्यावेळी दारांत उभे राहून या वेगाचा अनुभव घेता येईल. पण ओरिसातील वादळाचा वेग ताशी अडीचशे किलोमीटर आणि सतत ------ तास टिकून राहिला होता. असो.
या झंझावाताने झाडे उन्मळून पडली. अगदी दहा-बारा मीटर घेराची झाडे देखील समुद्र पह्यांत एरवी दृष्टि पोचेल तिथपर्यंत उंच उंच नारळ, पोफळी, आणि ताडाची झाड दिसतात ती एकतर भुईसपार झाली किंवा निम्म्यांत मोडली किंवा त्यांची पान फाटून चोळामोळा, विदूप होऊन गेली. जिथे ही झाड रस्त्यांवर पडली तिथे रस्ते बंद झाले. घरांवर पडली तिथे छप्परं तुटून गेली. शेतात, ओठ्यांवर आणि कालव्यांवर या किना-यापासून त्या किना-यापर्यंत, अशी कुठे कुठे पडली. समुद्रात वाहून गेली.
ओरिसात कांही मुख्य शहरांतल्या मुख्य इमारती सोडल्या तर बहुतेक घरं मातीची. वर भाताच्या पेंढ्या टाकून शाकारलेली. पेंढ्यांखाली आधाराला
बांबू. त्या पेंढ्या उडाल्या, बांबू तुटू गेले!
तडाख्याच्या वा-याबरोबर पाऊस सुरू झाला आणि त्याने तीन-चार दिवस थैमान घातले. ज्या मातीच्या घरांची छपर उडून-तुटून गेली होती त्यात पाऊस पडायला सुरुवात झाली. घरांत साठवलेल धान्य, कपडे, वह्या-पुस्तक सगळ त्या पाण्यांत भिजून नष्ट झाल. मातीच्या भिंतीवर पावसाचे तडाखे बसले आणि भिंती विरघळून जाऊ लागल्या- खचू लागल्या. कुठे पन्नास तर कुठे शंभर वर्षांपासून च्या भिंती आणि घरं ढेपाळत असतांना ते उघड्या डोळ्यांनी फक्त बघणे यापेक्षा हातात कांही उरले नव्हते.
किंवा ते बघायचे समाधान ते तरी होते कां? गांवात पक्की घर एखादे-दुसरीच. कुठे ती देखील नाहीत, पण मंदिर, मशीद, चर्च वगैरे इमारती पक्क्या. लोकांनी अशा घरांत आश्रम घेतला होता. वातावरण निवळल्यावर घरी परतले तेंव्हा फक्त खचलेली घरं उरली होती.
प्रत्येक गांवात मंदिर-मशीदींसारख्या धार्मिक इमारतींच्या जोडीला कांही सरकारी पक्क्या इमारती पण असतात. उदाहरणार्थ शाळा! तिथे लोकांना आश्रय घेता आला कां?
नाही-कारण सगळ्या शाळांवरची छप्पर आणि भिंती कमी-अधिक मोडून पडलेल्या होत्या. सरकारी इमारती अशा. तर सरकारीमाणसांची अवस्था याहून वाईट. वादळग्रस्त भागांत मदत म्हणून जे सामान पोचल- धान्य, ब्लँकेट्स, कपडे त्यांच योग्य वितरण होऊ शकेल अशी सरकारी यंत्रणाच नव्हती. त्याचे वेगवेगळे नमुने आणि वेगवेगळे किस्से ऐकायला मिळाले.
महाराष्ट्राशी तुलना करायची म्हटली तर इथल्या बहुधा प्रत्येक गांवात तलाठी, ग्रामसेवक, विविध कार्यकारी सोसायटीचा सेक्रेटरी, .एन्.एम्, आंगणवाडी वर्ळर असे सरकारी यंत्रणेपैकी कोणी ना कोणी तरी उपलब्ध असते. नैसर्गिक आपत्ति नंतर त्यांनी तत्काळ प्रत्येक घरांतील जीवित वा मृत. व्यक्तिंचा तसेच झालेल्या नुकसानीचा पंचनामा किंवा रिपोर्ट तयार करावा असे प्रशिक्षण मिळालेले असते. तहसिलदार, बीडीओ, तसेच प्रांत अधिकारी, कलेक्टर, सीईओ इत्यादि अधिकारी तत्काळ जागेवर जाऊन पोचतील अशी यंत्रणा असते. एखाद वेळी ही कोलमडते देखील. पण ओरिसात ही यंत्रणा अस्तित्वातच नव्हती. गांव पातळीवर जिथे जे सरकारी व्यक्ति होते ते निघून तरी गेलेले किंवा स्वतःचे घर सावरण्यांत गुंतलेले. तालुका व
वरिष्ठ अधिकारी राजकीय वरदहस्तामुळे पोस्टिंग मिळालेले म्हणून त्यांनाही मुख्यालयांत रहाणे बंधनकारक नाही. मुख्यमंत्री मुलाच्या आजारपणासाठी आणि सोनियाजींकडे आपली पत टिकवण्यासाठी आणि सोनियाजींकडे आपली पत टिकवण्यासाठी वारंवार दिल्लीत तर मुख्य सचिव चक्क अमेरिकेत! इकडे कांय होईल असा प्रश्नाविचारल्यावर आमचे इतर अधिकारी सक्षम आहेत ते बघून घेतील हे उत्तर!
पारादीप मधे एका आय्..एस् अधिका-याच्या कर्तव्यदक्षतेचे खूप किस्से ऐकायला मिळाले. कांही खरे, कांही खोटे. कारण तो स्वतः याबाबत कांही बोलू शकत नाही. पण किस्सा असा कि हा अधिकारी दुसरीकडे कुठल्याशी पदावर होता. वादळाची बातमी ऐकून मिळेल त्या वाहनाने- म्हणजे कार, ट्रक, मोटर सायकल, होडी, सायकल इत्यादि करत तो पारादीपला पोचला. स्वतः एअरफोर्सचा अधिकारी असल्याच सांगत. मग बीडीओच्या ऑफिसमधे जाऊन बसला- कारण सर्व मदतवाटप तिथून होत होतं. पाहतो तो सामान जाऊन बसलेल बडीओ, राजकीय नेते व इतर लहान मोठ्या अधिका-यांच्या घरात. लोकांना तीन-तीन दिवस उपास घडत होता पण यांची घरं भरत होती. मग त्याने आर्मीला
सांगितले की माझी सरकारने येथे स्पेशल नियुक्ति केली आहे, माझा हुकुम ऐका आणि दोन तासाची मुदत देऊन सगळ सामान पुनः ऑफिसमधे जमा करवू घेतल. रेड टाकण्याची धमकी देऊन. मग स्वतः सर्व सामान वाटप व्यवस्थित करवून घेतल. सरकारने एक बर केल- त्याची तिथे स्पेशल ऑफिसर म्हणून ऑर्डर काढली. या कहाणीतील अतिरंजन किती , खर किती, हा प्रश्न सोडून देऊ कारण त्याला अजून त्याच सरकारमधे खूप वर्ष काढायची आहेत. मात्र सरकारी मदत म्हणून आलेली ब्लँकेट्स, पॉलीथीन इत्यादि थेट कलकच्यापर्यंत बाजारात विक्रीला पोचली होती हे ही तेवढच खरं!
भुवनेश्वर हे राजधानीच ठिकाण. बहुतेक सर्व घरं पक्की. त्यांच नुकसान कांही नाही. मात्र झाडं उन्मळून पडल्याने जागोजागी रस्त अडले होते. विजेच्या व फोनच्या तारा तुटल्या होत्या. नुकसा एवढेच. पण मंत्रालयात अधिकारी व कर्मचारी न येणे किंवा उशीरा येणे सुरु झाले. कारण कांय? तर या भयानक वादळामुळे जे नुकसान इतरत्र झाले असेल, त्याची कल्पना करून करून माझे हात-पाय गळाले! अस म्हणतात की निदान सेक्रेटरी पदाच्या अधिका-यांनी तरी दहा वाजता ऑफिसात हजर राहिलच पाहिजे असे सरकारला आदेश काढावे लागते!
वादळात तोंड द्यायचं आहे या इच्छा शक्तीचा सर्वत्र अभाव दिसून आला.
दिल्लीहून पहाणीसाठी गेलेल्या अधिका-याने एक किस्सा सांगितला- भुवनेश्वर कटक कलकत्ता हायवेवर त्यांची गाडी थांबली- पुढे ट्रँफिक जाम! उतरून पाहिल तर एक भल मोठ झाड रस्त्यावर आडव पडलेलं. कांही मुलं अजून जमीनीत रुतलेली पण बुंधा हलवता येऊ शकत होता. याने स्वतःचे दोन अधिकारी बोलावले व इतर अडलेल्या प्रवाशांना मदत करायला सांगितली तेंव्हा कुणी पाठ दुखते, हात दुखतात अस सांगत बाजूला झाले. शेवटी आर्मीच्या जीपमधला एक कॅप्टन व चार पाच सैनिक आले. सर्वांनी मिळून झाड हलबल. या प्रकारे सुमारे तेहतीस किलोमीटर रस्ता यांनी दहा-बारा झाड हलवून मोकळा केला पण मदतीला इतर कुणी पुढे आल नाही. इच्छा शक्ती नसण्याच हे ही एक उदाहरण.
वादळानंतर सुमारे महिन्याभराने मी तिकडे गेले असतांना चित्र जवळजवळ तेच होत. शाळा दुरुस्त करावी, निदान विद्यार्थ्यांना घेऊन स्वच्छ करावी- बाहेर उघड्यावर बसून कां होईना - पण वर्ग चालू ठेवावेत- वह्या पुस्तकं नसतील पण तोंडी शिक्षण सुरू ठेवावं- अस कांहीही कुठेही सुरू नव्हत. लोकांना रोजगार पुरवावा, असही चित्र नव्हत. जवळ जवळ दहा
जिल्ह्यांमधे शेती नष्ट झाली. त्यासाठी योजना किंवा आढावा नव्हता. किमान पाच ब्लॉक्स मधे जीवितहानी झाली. मुल, माणस अनाथ झाली- त्यांच्यासाठी योजना नव्हती. गांवागांवात बायका व मुली मेहनतीची काम करत होती- घराच्या मातीच्या भिंती पुनः बांधून काढायचा प्रयत्न करत होती पण तरुण मुल- पत्ते खेळत होती. नशीब चोरी- दरवड्यासाठी इकडे तिकडे जात नव्हती- अशीही एक प्रतिक्रिया!
खूप संस्थांनी स्वतःच्या ट्रक्स मधून मदत सामान आणल होत. पण सरकारी यंत्रणा नसल्याने हे ट्रक्स हायवेवर थांबून थोड सामान वाटून पुढे जात. तिथे थांबे करून बसलेली तरुण मंडळी सामान गोळा करत आणि पुनः जाऊन पत्ते खेळत बसत.
मात्र आंध्र प्रदेश कडून तातडीने जी मदत आली- टेलिफो संपर्क यंत्रणा सुधारण्यासाठी, रस्ते मोकळी करण्यासाठी आणि इतरही खूप प्रकारांनी- त्यामुळे मात्र आम्हाला चंद्राबाबू नायडूच मुख्यमंत्री हवेत असे म्हणणा-यांचा एक मोठा वर्ग तयार झाला आहे.
आज वादळानंतर तीन महिने होऊनही इच्छाशक्ती आहे कां ही शंका कायम रहाते. पण कमी अधिक प्रमाणात सर्वच सरकारी यंत्रणेत ती जाणवत नाही कां?

चक्रीवादळाने किंवा हायजॅकिंग सारख्या घटेमुळे ती थोडी उघडी पडते एवढेच!
------------------------------------------------------------------------

गुरुवार, 22 सितंबर 2016

चिंतामण मोरया

चिंतामण मोरया
                                   ... लीना मेहेंदळे

       माझ जन्मक्षेत्र धरणगांव, माझ्या आजोबांच्या तरुण वयात हे गांव तालुक्याचे शहर बनू शकेल या क्षमतेच होत.  तस झाल नाही कारण गांवाला बारा महिने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारे साधन नाही, नदी नाही म्हणून ब्रिटिश राजवटीत धरणगांव ऐवजी पंधरा किलोमीटर दूर असलेल एरंडोल हे तालुक्याच ठिकाण झाल. अगदी अलीकडे - पाच सात वर्षापूर्वी धरणगांव हा वेगळा तालुका करण्यांत आला.
       माझा जन्म घरातच झाला.  आई सांगते, जेव्हा अस वाटल की आज उद्यात कांही तरी होणार आहे, तेव्हा घरातली सर्वांत मोठी खोली - म्हणजे देवघर रिकामी केली आणी खाट वगैरे टाकून तिथेच तयारी केली.  माझी आत्या आणी गांवातली एक सुईण यांनी मिळून बाळंतपण केल.  दुपारी दीड दोन ची वेळ होती.  वडील नोकरी निमित्त बाहेर होते. आजोबा दुपारच्या जेवणासाठी दुकानातून घरी आलेले.  मुलगी झाली समजल्यावर थोडया कष्टी मनाने दुकानात परत गेले.  दुपारी त्यांच्या कडे अचानक दोन तरुण आले.  साडेतीन हजार रुपये घेऊन. त्यांच्या वडिलांनी पूर्वी कधी तरी दुकानातून मोठी उधारी घेतली होती.  आर्थिक तंगी मुळे ती फेडायला जमली नव्हती. पुढे परिस्थिती सुधारली पण माणूस फार आजारी झाला.  त्यातच मरण पावला. पण मरतांना बजाऊन गेला 'अरे त्या सज्जन ब्राह्मणाचे पैसे बुडवू नका, वचन द्या.' म्हणूनच तेरावा उरकल्यावर दोघ मुल पैसे फेडायला माझ्या आजोबांकडे आली होती.
       मग तर आजोबांनी लगेच दुकान बंद केल - नवजात नातीसाठी सोन्याची चेन आणी शेजारी पाजारी वाटायला मिठाई घेऊनच आले.  बडी बेटी धनाची पेटी अस सर्वांना सांगून टाकल.  योगायोग असा की माझ्या दर वाढदिवसाला आई वडिलांना कुठून तरी लहान - मोठा अवचित धन लाभ होत आलेला आहे. रक्कम क्षुल्लकच असायची पण कुठेतरी केलेल्या कष्टाचा राहून गेलेला मेहनताना अस त्याच स्वरुप असायच.  माझे वडील उत्तम ज्योतिषी होते - पण पैसे घेत नसत.  मात्र आम्ही बिहार मध्ये होतो.  तिथे पध्दत अशी होती कि ज्योतिषाला काही तरी द्यावे.  तसेच बिहार मध्ये शेती उत्पन्नाची सुबत्ता फार.  म्हणून मग वडिलांकडे कधी भाज्या, कधी फळ, कधी मिठाई अशी आणली जायची.  असाच काहीसा लाभ माझ्या वाढदिवशी झाला, तर तो माझ्या नांवाने जमा होई.
       त्यामुळे जन्मापासून मी आजोबांची अतिशय लाडकी होते.  माझ्यावर कधीही हात उगारायचा नाही अशी घरांतील सर्वांना आजोबांची सक्त ताकीद होती.  माझ्या सगळयाच  सख्ख्या - चुलत - आते भावंडांनी लहानपणी कधी ना कधी मार खाल्लेला आहे.  पण मी मात्र थाटात असायची.
       आजोबा पंचक्रोशीत हुषार आणि हरिभक्त म्हणून गाजलेले होते.  सन्‌ एकोणवीसशे दहा मध्ये त्या काळात प्रतिष्ठेची मानली जाणारी व्हर्न्यक्युलर फायनल (सातवी) परिक्षा पास होऊन आपल्याच शाळेत गणिताचे शिक्षक म्हणून लागले. पण त्यांच्या वडिलांनी सांगितले की नोकरी तुझ्या एकट्यापुरती राहील, त्याऐवजी संपूर्ण कुटुंबासाठी असेल असे काहीतरी कर. म्हणून त्यांनी नोकरी सोडून देऊन गांवातली पहिली लाकडाची वखार टाकली आणि दुकानावर बसू लागले ते एकोणवीसशे पंचावन्न पर्यंत.


       त्या काळांत धरणगांव हे प्रत्यक्ष तालुक्याचे ठिकांण नसले तरी गांवाचा रुबाब इतर तालुका शहरांसारखाच होता.  धरणगांव ही एक मोठी बाजारपेठ होती.  त्या काळांत गांवात सिमेंटचे रस्ते होते.  गांवात विणकर समाज फार मोठा होता. तिथे हातमागावर तलम लुगडी, धोतर आणि सतरंज्या विणल्या जात.  धरणगांव, धुळे, सूरत अशा तीन मोठया बाजारपेठ त्यांना मिळत.  त्यामुळे आजोबांची वखार पण उत्तम चालली - शेजारी अजून कांही वखारी उभ्या राहिल्या.  वखारीच्या खरेदीसाठी आजोबा पार कलकत्त्या पर्यंत जात.  हे सर्व क्षेत्र गांवठाणाच्या थोड बाहेर, रेल्वे स्टेशनाच्या जवळ होते.  निधून थोड पलीकडे चिंतामण मोरयाचे मंदिर होते.  उत्तम पाषाण व फरश्यांनी बांधून काढलेल्या या मंदिरातील गणेश मूर्ति - स्वयंभू आहे.  या मंदिरात प्रत्येकाच्या मनातली - इच्छा पूर्ण होते असे मानतात.  आजोबांच्याही शंभर - दिडशे वर्ष मागे त्या मूर्तीचा जीर्णोद्वार करण्यांत आल्याचा संगमरवरी दगडावर कोरलेला आलेख आहे.  लहानपणी आजोबा मला इथे होऊन यायचे.  पाढे, स्तोत्र आणि गणित शिकवायचे, अस अंधुक अंधुक आठवत.  आजी खूप खूप पूर्वीच वारली. घरांत आजोबा, आई, आजोबांच्या धाकटया भावाचा मोठा गोतावळा व शिकण्यासाठी येऊन राहिलेली इतर नातेवाईक भावंड. त्या सर्वांना अभिमानाने माझ्या गणितातील प्रगति बद्दल आजोबा बोलून दाखवीत.
       मी सात वर्षाची असतांना वडिलांना मध्य प्रदेशात जबलपूर येथे कॉलेज मध्ये लेक्चररची नोकरी मिळाली.  तेव्हा आजोबांनी वाटे हिस्से केले.  वखार आपल्या धाकटया भावाकडे सुपूर्द केली आणी आम्ही जबलपूरला आलो.
       मला शाळेचा पहिला दिवस आठवतो.  मला सरळ तिसरी इयत्तेत घेतले होते.  तेव्हा तोंडी गणितांची परंपरा होती.  आजोबा तर उठ - सूठ तोंडी गणित विचारत आणि गणित सोडवण्याच्या नाना युक्त्या पण सांगत.  त्यांना लगेच उत्तर सांगून मी मोकळी होत असे.  पण शाळेत तस नव्हत.  पाटी वर उत्तरे लिहायची होती.  दहा तोंडी गणितांची दहा उत्तर.  त्यांत माझा उत्तरे लिहिण्याचा क्रम उलट सुलट झाला आणि माझी तीन उत्तर चुकली.  पन्नास पैकी फक्त पस्तीस मार्क.  मला रडू कोसळल. तेवढयांत मास्तर विचारू लागले -- सगळयांत जास्त मार्क पस्तीस - ते कोणी मिळवले ? कोण ही नविन मुलगी ? घरी आजोबांना हा किस्सा सांगितला.  तेव्हापासून ते पाटीवर उत्तरे लिहायची - सवय करुन घेऊ लागले.
       पुढे दोन वर्षांनी आजोबा वारले आणि आम्ही पण जबलपूर मध्य प्रदेश सोडून लांब दरभंगा, बिहार येथे गेलो.  मात्र दर वर्षी उन्हाळ्याच्या सुटीत धरणगांवला येत राहिलो.  आजोबा साळी समाजाच्या सभागृहामध्ये भजन व कीर्तन करीत असत.  तिथेच वडिल महिनाभर दररोज सकाळी ज्ञानेश्वरी वर प्रवचन करू लागले. वडिलांचा  हा क्रम अव्याहतपणे सुमारे चाळीस वर्ष चालला.
       सुटीत धरणगांवला आल्यावर दररोज चिंतामण मोरयाच्या दर्शनाला जावे हा जणू नियमच ठरून गेला.  तसे गावात इतर बऱ्याच मंदिरात फेरफटका मारला जाई. पण गावकुसाबाहेर शेत आणि बाभळीच्या बनातून गेलेल्या पायवाटेने चिंतामण मोरयाला जाण्याची ओढ वेगळीच होती.  तिथे वेळ असेल त्या प्रमाणे प्रदक्षिणा व अथर्वशीर्षाचा पाठ आम्ही करीत होतो.  कधी फक्त एक तर कधी  एकदम एकवीस पर्यंत.  तिथे जाऊन मला नेहमी वाटे - याला कांय मागायच ? याला सगळी माहित आहेच.  पण इतर जण सांगत - अस नाही म्हणू - या मूर्तीपुढे आपले मन बोलून दाखवले - तर हवे ते मिळते.  आजही आमच्या घरांत काही अडले नडले तर पटकन्‌ मोरया, तुला नारळ फोडीन अस म्हटल जात.

      दर वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत धरणगांवला येणाच्या कार्यक्रमामुळे तिथले रस्ते असे तोंडपाठ की डोळे मिटून किंवा अंधारात चालेले तरी हरकत नाही.  आज इतकी वर्ष झाली पण ते सिमेंटचे रस्ते, धाब्याची घरे, दुकान, पिठाच्या गिरण्या, कोट (बाजाराची भली मोठी बांधीव जागा), मंदिर, शाळा, बरीचशी झाडे पण तश्शीच आहेत.  मात्र चिंतामण मोरयाचा परिसर बदलला.  गेल्या दहा वर्षात मंदिराच्या आसपास इतर बरीच मंदिर काढली आणि त्या छोटया परिसराला खेटून खूप घरं आणी खूप लोकवस्ती झाली.
       आता माझ धरणगावी किंवा मोरयाला फारस जाण होत नाही.  पण कुणीतरी धरणगांवचा वारसा सांगणारा संगणक शिकला आणि त्याने चक्क चिंतामण मोरया डॉट कॉम अशी साइट बनवून टाकली.  ज्यांनी मोरयाची प्रचीति घेतली आहे असे शेकडो लोक त्याला दुवा देत आपल्या संगणकावर मोरयाचे दर्शन घेत असणार यात मला शंकाच नाही. 
--------------------------------


                                 
 
       
































































भाप्रसे मधे कााय असते

बायो डाटा
धरणगांव, जिल्हा जळगाव येथे १९५० मधे जन्म. बिहार मधे  M.Sc. Physics पर्यंत शिक्षण व लेक्चररशिप. १९७४ ला IAS मधे प्रवेश. खानदेशातील पहिली महिला अधिकारी म्हणून मधुकरराव चौधरींनी खास तार पाठवून अभिनंदन केले. पुणे, औरंगाबाद, मुंबई, सांगली, नाशिक दिल्ली येथे विविध सरकारी पदांवर काम केले कलेक्टर, सीईओ, कमिशनर, उद्योग महामंडळ, राष्ट्रीय महिला आयोग, केंद्र शासनात पेट्रोलियम कंझर्वेशन रिसर्च असोसिएशनची डायरेक्टर वगैरे कामे सांभाळली. महाराष्ट्रातून अतिरिक्त मुख्य सचिव या पदावुून निवृत्तिनंतर Member CAT व CIC, Goa ही पदे भूषविली. सांगली कलेक्टर असतांना केलेले देवदासी पुनर्वसनाचे काम बरेच नावाजले गेले.
उत्तम लेखक व वक्त्या म्हणून प्रसिद्ध. मराठी, हिंदी व इंग्रजीतून लिखाण. विषय बहुतेक प्रशासनिक व सामाजिक. सोबत बाल वाङमय, विज्ञान लेखन,  निसर्ग निरीक्षण, आणि इतर भाषांमधून मराठी व हिंदीत अनुवाद केले आहेत.
पुस्तके --- १) ये ये पावसा - बाल कथा संग्रह, २) सोनं देणारे पक्षी --  निसर्ग निरीक्षण, ३) नित्य लीला - मराठीत अनुवाद - कथासंग्रह ४) लोकशाही -- इंग्रजीतून अनुवाद ५) आनंदलोक -- कुसुमाग्रजांच्या शंभराहून अधिक कवितांचा हिंदी अनुवाद. हिंदीत इतर पाच पुस्तके. अणु विज्ञानावर दीर्घ लेखमाला आकाशवाणी सांगलीवरून प्रसारित.    
 लीना मेहेंदळे यांच्या लेखाला पुरवणी  पान २
------------------------------------------------------------
भारतीय सेवांच्या बाबतीत थोडे दाखले देऊन बोलायचे म्हटले तर या सेवांमधे ज्यांनी ठळकपणे उठून दिसणारी कामे केली अशी कित्येक उदाहरणे देता येतील. मुंबईत झोपडपट्टीत रहाणार्‍याचे प्रश्न हाताळणारे व नंतर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त झालेले तिनईकरांचे उदाहरण घ्या. आजही झोपडपट्टीवासियांच्या प्रश्नांची जाण जेवढी त्यांना आहे तेवढी कुणालाच नसेल. मुंबई महानगरपालिकेचेच आयुक्त असलेल्या शरद काळे यांनी नगरपालिकेच्या शाळांची शैक्षणिक गणवत्ता सुधारण्याचा कार्यक्रम हाती घेतल्यावर आयसीआयसीआय बँकेपासून सर्वांनी त्या मधे सहभाग घेतला. पंजाब मधे अतिरेक्यांचा प्रश्न उसळला तेंव्हा कडक शिस्तीचा, कणखर पण तिथल्या लोकल पाँलिटिक्सच्या दृष्टीने त्रयस्थ अधिकार्‍याची गरज भासली तेंव्हा रिबेरो यांचीच निवड झाली. आजही सिंधुदुर्ग जिल्ह्यांत प्रोढ शिक्षणाच्या कामासाठी संजीवनी कुट्टी, पंढरपुरच्या वारीमधे शिस्तबद्ध व्यवस्था निर्माण करण्यासाठी रमानाथ झा, ठाणे व नागपूर शहरांतील रस्ते सुधारण्यासाठी चंद्रशेखर, महिला धोरणासाठी चंद्रा अय्यंगार या सारख्या IAS अधिकार्‍यांची आठवण काढली जाते. वन अधिकारी म्हणून नोकरीत लागलेले मारुती चित्तमपल्ली उत्तम निसर्ग निरीक्षण व लिखाणासाठी प्रसिद्ध झाले ते नोकरीतील अनुभवांमुळेच. चांगल्या पोलिस प्रशासनासाठी सतीश साहनी, अरविंद ईनामदार, अनामी राय, मीरा बोरवणकर, सुरेश खोपडे यांची नांवे फक्त लोकच घेतात असे नाही तर त्यांचे संपूर्ण खातेच त्यांच्या चांगल्या कामाकडे आशेने डोळे लावून बसलेले असतात. मीरा बोरवणकर यांनी ओरंगाबाद व सातारा येथे DSP म्हणून जी उत्तम कामगिरी बजावली, किंवा जळगांव सेक्स स्कँडलचा पाठपुरावा ज्या हिरिरीने केला, त्यामुळेच आज त्यांचे मुंबईत पोस्टिंग झाल्याझाल्या जवळ जवळ प्रत्येक वर्तमानपत्राने त्यांचे स्वागत केले आहे. उत्कृष्ट कामाबाबत एवढी व्यापक पावती इतर कुठल्याही नोकरीत मिळू शकत नाही.
माझा स्वतचा अनुभव हेच सांगतो की चांगले प्रशासन पुरवण्याची कळकळ असलेले अधिकारी लोकांना दीर्घकाळ लक्षांत रहातात. याबाबत नुकताच झालेला एक संवाद आठवतो. तीन चार महिन्यांपूर्वी मी तेलगी प्रकरणाबद्दल लेख लिहिला होता. त्यांत तेलगी सारख्या प्रकरणी लौकर व पुरेशी शिक्षा न झाल्यास सचोटीने काम करणार्‍या अधिकार्‍यांचे कसे खच्चीकरण होत जाते इत्यादि लिहिले होते. लेख जरा परखडच होता. तो वाचून मुंबईहून एका व्यक्तीने मला फोन केला. मी सांगलीला कलेक्टर असताना नियमबाह्य किंवा बेजबाबदार वागणार्‍या दारुच्या दुकानांबाबत कसे कडक धोरण ठेवले होते, धनदांडग्यांना न जुमानता त्यांचे परवाने रद्द केले होते, प्रत्यक्ष गावात जाऊन मी पहाणी करीत असे आणि अंमलबजावणीबद्दल काटेकोर होते वगैरे गोष्टी त्या वेळी आठवी नववीत असलेला त्या गावातला एक विद्यार्थी पहात होता व त्या बद्दल त्याच्या मनात आदर निर्माण होत होता. एवढी वर्ष या घटना त्याने  लक्षांत ठेवल्या होत्या. आता माझा पत्ता माहित करून घेऊन मला फोन करीत होता. त्या गावांतील घटनेच्या दिवशीच त्यांच्या शिक्षकाच्या घरी जन्मलेल्या नवजात मुलीचे नाव त्याने व त्याच्या मित्रांनी आग्रहाने लीना असे ठेवायला लावले होते. फोन वर हे सर्व ऐकत असताना मी अक्षरश अवाक्‌ झाले होते. भारतीय प्रशासनिक सेवेत येऊन योग्य प्रकारे काम केले तर त्याची पावती कुठल्या कुठल्या कान्या कोपर्‍यातून मिळत राहील तो अंदाज करणे अशक्यच. आसाम मेघालयच्या चीफ सेक्रेटरी असलेल्या प्रतिभा त्रिवेदी यांनी मला त्यांच्या आठवणीतला एक किस्सा सांगितला. त्या कधी एकदा खांडवा येथे असिस्टंट कलेक्टर असताना एका दुष्काळी गावात त्यांनी आपले सर्व अधिकार पणाला लावून दुष्काळी विहिरींचे काम करून घेतले होते. आता त्या रिटायर झाल्या आहेत. पण त्या गावातील शेतातला मेवा अजूनही त्यांच्याकडे आदराने नेऊन दिला जातो. कामाचे समाधान, चांगले काम करण्याची संधी, आणि त्या
कामासाठी लोकांनी दिलेली पावती जेवढी या नोकरीत आहे तेवढी इतरत्र कुठेही नाही. म्हणूनच ज्यांना देशासाठी, समाजासाठी व लोकांसाठी काही करायचे आहे त्यांच्यासाठी निश्चितच हे अतिशय उत्तम करियर आहे.
---------------------------------------------------------------

मंगलवार, 20 सितंबर 2016

घडीपत्रक

घडीपत्रक -- 

इथे वि

तालुका निरीक्षक भूमि अभिलेख यांना यावयास पाहिजे अशी प्रमुख कामे
) तांत्रिक कामे -
) मूळ जमाबंदी व पुनर्मोजणी कामाची माहिती.
)जमिनीची प्रतवारी व आकार ठरविणे.
) शंकु साखळी मोजणी, क्षेत्र काढणे.
) प्लेन टेबलने जमिनीची  हद्द बंदी, भूसंपीदन, अकृषिक व सविस्तर मोजणी, व त्या प्रकरणाचे परिनिरीक्षण.
) दुर्बिण मोजणी व अनुषंगिक गणित काम.
) जमीन महसूल संहिता १९६६, कलम २० () अन्वये चौकशी काम.
) सनद व मिळकत पत्रकाची.. माहिती.
) नगर भूमापन परिरक्षणाचे  काम.
) पुनर्विलोकन कामाची माहिती असणे व तपासणी करण्याचे  ज्ञान असावे.
१०) नगर भूमापनाचे आधिकार अभिलेख व नकीशा अद्ययावत ठेवणे.
११) गांव नमुना नंबर २ अद्ययावत आणणे.
१२) बिनशेती सारा आकारणी कायम करून घेणे.
१३) भूमी अभिलेख दुरूस्ती कामे , कमी जास्त पत्रक, आकारफोड, क्षेत्र काढणे.
१४) ले आऊट प्रमाणे भूमी अभिलेख दुरूस्ती करणे.
१५) तलाठी दप्तर तपासणी.
) भूमापन किंवा महसूल अधिकारी यांनी दिलेल्या निर्णयाची नकल व त्या संदर्भात इतर सर्व प्रकारचे कागदपत्र.
) फेरफार नोंदी / मिळकत पत्रिकेची नक्कल / किंवा इतर विहीत प्रपत्रांची  (prescribed form) नक्कल.
) नकाशाची  नक्कल.
ज्या कार्यालयांना झेरॉक्स मशीन पुरविणेत आल्या आहेत अशा सर्व कार्यालयांना यांकित प्रमाणित नकल देणे शक्य व्हावे म्हणून खालीलप्रमाणे तात्पुरत्या सूना देण्यांत येत आहेत ----
)झेरॉक्स मशीनवर ..याप्रत काढतांना ..याप्रतीसाठी  -३ साईजचा पांढरा कागद वापरावा.
) झेरॉक्स मशीनवर वापरून ए.३ साईज कागदा.. एका बाजूवर काढलेली प्रत प्रतेकी पां..( - रुपये मात्र )
) वरीलप्रमाणे नक्कल देतांना ..याप्रत करावया.. कागदां.. आकारमान कमी जास्त असले तरी एका बाजू.. झेराँक्स पेरत देणेयास ५- रुपये फी आकारणे.. आहे. हे तत्व लक्षांत घ्यावे. यामध्ये compering फी, कागद फी व प्रमाणित करण्या.. फी या सर्व बाबीम.. समावेश आहे.
) विहित परिमाणांत तयार केलेल्या कोणत्याही नकाशा.. नक्कल झेराँक्स मशीनवर देऊ नये. कारण नकाशा.. नक्कल झेराँक्स मशीनवर काढल्यास तो स्केलाप्रमाणे तंतोतंत १००% बरोबर निघेल या.. शाश्वती देता येत नाही. म्हणून सर्व नकाशां.. नकला पूर्वीप्रमाणे.. तयार करून पूर्वी विहित केलेल्या दराप्रमाणे.. फी आकारणे.. आहे. त्यामध्यें बदल करणेत आलेला नाही.
) झेराँक्स मशीनवर देण्यात येणार्या नकला संबंधित सक्षम अधिकारी यांनी प्रमाणित करणे.. आहेत.


सदर आदेशा.. अमलबजावणी त्वरीत होणए.. आहे.